गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा बदल: अखिल मंडई मंडळ आणि रंगारी ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय
गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा बदल: अखिल मंडई मंडळ आणि रंगारी ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा बदल! अखिल मंडई मंडळ व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट यांनी यंदा मानाच्या पाच गणपतींनंतर मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रहणकाळामुळे वेळेच्या आधी विसर्जनाची तयारी.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : पुण्यातील ऐतिहासिक आणि भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा महत्त्वपूर्ण बदल होत आहे. अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या दोन प्रतिष्ठित गणेश मंडळांनी यावर्षीपासून विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतींनंतर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
ही माहिती दिली पत्रकार परिषदेमध्ये, ज्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, संजय मते आणि विश्वास भोर उपस्थित होते.
🕉️ या निर्णयामागील महत्त्वाचे कारण म्हणजे ७ सप्टेंबर २०२५ रोजी लागणारे खग्रास चंद्रग्रहण. धार्मिक शास्त्रानुसार ग्रहण काळात देवमूर्ती झाकून ठेवावी लागते आणि त्याआधी त्या मंदिरात परत आणणे आवश्यक असते. त्यामुळे मंडळांनी ठरवले आहे की विसर्जन मिरवणुकीत त्यांचा गणपती मानाच्या पाच गणपतींच्या पाठोपाठ मार्गस्थ होईल.
🔸 अण्णा थोरात यांनी सांगितले की, मागील काही वर्षांपासून पोलिस प्रशासनाने वेळेवर मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी न दिल्यामुळे वेळा पुढे ढकलल्या जात होत्या. त्यातून मूर्ती मंदिरात परत आणण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे यंदा मंडळाने स्वतःहून हा योग्य निर्णय घेतला आहे.
🔸 पुनीत बालन यांनी स्पष्ट केले की, ग्रहण ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३७ ला सुरु होत असल्याने त्याआधी अर्धा तास म्हणजे किमान १२:०० पूर्वी विसर्जन प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी लवकर मिरवणूक पार पाडावी, जेणेकरून पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांवरचा भारही कमी होईल.
🔸 मंडळांकडून सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले आहे की विसर्जन मिरवणूक रविवारी दुपारी १२ पूर्वी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.
या निर्णयामुळे पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत शिस्तबद्धता, धार्मिक नियमांचे पालन आणि प्रशासनाचे नियोजन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.