अमेरिकेच्या व्हिसा धोरणात बदल; हजारो भारतीयांना देशात परत पाठवले
अमेरिकेच्या व्हिसा धोरणात बदल; हजारो भारतीयांना देशात परत पाठवले
अमेरिका स्थलांतर धोरणात बदल करत असून त्याचा भारतीय नागरिकांवर मोठा परिणाम होत आहे. जानेवारी 2025 पासून अनेकांना परत पाठवण्यात आले.
सायली मेमाणे,
पुणे ३० मे २०२५ : अमेरिकेने अलीकडे आपल्या स्थलांतर धोरणामध्ये काही महत्त्वाचे बदल केले असून, त्याचा थेट परिणाम अनेक भारतीय नागरिकांवर झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 पासून सुमारे एक हजार भारतीयांना अमेरिकेने त्यांच्या देशात परत पाठवले आहे. यामध्ये काहींना वैमानिक मार्गाने परत आणण्यात आले तर काही प्रकरणांमध्ये कठोर उपायांचा अवलंब करण्यात आला.
ही कारवाई करण्याआधी प्रत्येक व्यक्तीचा भारतीय नागरिक म्हणून शासकीय स्तरावर तपास केला जात असल्याचं स्पष्ट केलं गेलं आहे. अशा कारवायांमुळे अनेक भारतीय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, अमेरिकेने विद्यार्थ्यांच्या व्हिसा प्रक्रियेतही कठोरता वाढवली आहे. विशेषतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या व्यवहारांवर आधारित तपासणी करण्यात येत आहे. परिणामी, काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मुलाखती स्थगित करण्यात आल्या आहेत, ज्याचा परिणाम त्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे.
2023-24 या शैक्षणिक वर्षात सुमारे 3.3 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे स्थलांतर धोरणातील कोणतेही बदल भारतीय विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम करू शकतात.
भारत सरकार या घडामोडीकडे गांभीर्याने पाहत असून, परराष्ट्र स्तरावर सातत्याने संपर्क साधला जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यावर आधारित संधी मिळाव्यात, ही भारताची भूमिका स्पष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर स्थलांतर धोरणातील कठोरतेमुळे जागतिक शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिक सजगतेने आणि तयारीने पुढे जाण्याची गरज निर्माण झाली आहे.
1 thought on “अमेरिकेच्या व्हिसा धोरणात बदल; हजारो भारतीयांना देशात परत पाठवले”