Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार का? सोशल मीडियावर
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार का? सोशल मीडियावर
Asia Cup 2025 सुरू होण्याआधी भारत-पाकिस्तान सामन्यावर गोंधळ. सोशल मीडियावर #BoycottIndVsPak ट्रेंड, बीसीसीआय व ACC निर्णयाची वाट पाहत.
सायली मेमाणे
पुणे २० ऑगस्ट २०२५ :मुंबई : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असतानाच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठा गोंधळ उभा राहिला आहे. बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली असून 10 सप्टेंबरला भारत यूएई विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला सर्वांच्या नजरा लागलेल्या IND vs PAK या रोमांचक सामन्यावर असतील. मात्र, आशिया कपपूर्वीच या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
पाकिस्तानविरुद्ध सामना रद्द करण्याची मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. काही संघटनांनी तसेच अनेक चाहत्यांनी, सध्याच्या परिस्थितीत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी भूमिका घेतली आहे. ट्विटर (X) आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर #BoycottIndVsPak हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
राजकीय आणि सीमावर्ती तणाव लक्षात घेता, भारतात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याला विरोध होत आहे. विशेषतः आशिया कपसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशा सामन्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो, असा दावा होत आहे.
सध्या तरी बीसीसीआयने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, सामना रद्द करण्याचा निर्णय एकट्याने बीसीसीआय घेऊ शकत नाही. याबाबत एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि सर्व सदस्य देशांशी चर्चा होणे आवश्यक आहे.
तसेच, प्रसारमाध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, भारतातील लाखो क्रिकेट चाहत्यांना हा सामना बघायचा आहे. त्यामुळे सामना रद्द करणे हे आर्थिकदृष्ट्याही मोठे नुकसान ठरू शकते. ब्रॉडकास्टिंग राईट्स आणि जाहिरात महसूल या बाबी देखील लक्षात घेतल्या जात आहेत.
सामन्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे चाहत्यांमध्ये नाराजी वाढली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी “IND vs PAK सामना हा केवळ क्रिकेट नाही तर भावना आहेत” असे मत व्यक्त केले आहे. काहींनी मात्र पाकिस्तानविरुद्धचा सामना पूर्णपणे रद्द करून भारताने इतर संघांविरुद्ध स्पर्धा खेळावी, अशीही मागणी केली आहे.
- 9 सप्टेंबर 2025 – आशिया कपची सुरुवात
- 10 सप्टेंबर 2025 – भारत विरुद्ध यूएई
- 14 सप्टेंबर 2025 – भारत विरुद्ध पाकिस्तान (अनिश्चितता कायम)
- पुढील सामने – निकालानुसार ठरणार
आशिया कप सुरू होण्यास अवघा तीन आठवडे उरले आहेत. अशा वेळी भारत-पाकिस्तान सामन्याभोवती निर्माण झालेला गोंधळ ही निश्चितच मोठी बातमी आहे. बीसीसीआय आणि एसीसी या संदर्भात पुढील काही दिवसांत निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.