ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला बॅनरबाजीची जोरदार साथ, मुंबईत गणेशोत्सवात राजकीय रंग

0
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला बॅनरबाजीची जोरदार साथ, मुंबईत गणेशोत्सवात राजकीय रंग

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला बॅनरबाजीची जोरदार साथ, मुंबईत गणेशोत्सवात राजकीय रंग

मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला वेग आला आहे. गिरगाव, दादर, चर्नीरोड परिसरात समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होत असून राजकीय वातावरण तापले आहे.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑगस्ट २०२५ : मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. पण धार्मिक उत्साहाच्या जोडीला राजकीय वातावरणालाही ताप आले आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेने आता रस्त्यावर रंग घेतला असून मुंबईच्या गिरगाव, दादर आणि चर्नीरोड परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू झाली आहे. या बॅनरबाजीतून कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे खुले आवाहन केल्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच खतपाणी मिळाले आहे.

गणेशोत्सव हा मुंबईकरांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा सण असला तरी, या सणाचा राजकीय रंग नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यंदा विशेष म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणाला कोणता कलाटणी मिळेल, याची चर्चा आधीच रंगली होती. आता त्यात बॅनरबाजीमुळे उधाण आल्याने या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. समर्थकांच्या बॅनरवर “ठाकरे एकत्र या”, “बंधूंची युती हीच खरी शिवसेना” अशा घोषणा झळकत आहेत. त्यामुळे या राजकीय संदेशाचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील गणेश मंडळे आणि परिसरांमध्ये बॅनर लावणे हे नेहमीचे असले तरी यावेळी ठाकरे बंधूंवरील बॅनरबाजीमुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. अनेकांनी हे बॅनर सोशल मीडियावर शेअर करत वातावरण अजूनच तापवले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघेही बंधू आपापल्या शैलीत काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे विरोधी पक्षांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी रंगणे ही महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग मानली जाते. पूर्वी अनेक महत्त्वाच्या घोषणा या सणाच्या निमित्ताने झालेल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला मिळालेली ही नवी गती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. सध्या बॅनरबाजी ही कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग असला तरी तिचा राजकीय संदेश स्पष्ट आहे – ठाकरे कुटुंब एकत्र आल्यास जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळेल.

मुंबईच्या रस्त्यांवर लागलेले हे बॅनर केवळ राजकीय वातावरण पेटवत नाहीत तर गणेशोत्सवाचा उत्साहही दुप्पट करत आहेत. भक्तीच्या माहोलात राजकारणाचा मसाला मिसळल्यामुळे सणाला एक वेगळाच रंग चढला आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे बंधूंची युती होते की नाही हे स्पष्ट होईल, पण सध्या तरी बॅनरबाजीने मुंबईकरांचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *