मुंबई पोलिसांचा धक्कादायक कारवाई! बांगलादेशी किन्नर ‘गुरु मा’ अटक; बनावट कागदपत्रे आणि मानव तस्करीचा मोठा रॅकेट उघड
मुंबई पोलिसांचा धक्कादायक कारवाई! बांगलादेशी किन्नर ‘गुरु मा’ अटक; बनावट कागदपत्रे आणि मानव तस्करीचा मोठा रॅकेट उघड
मुंबई : बनावट आधार-पॅन कार्डसह बांगलादेशी किन्नर ‘गुरु मा’ उर्फ ज्योती शेख अटक; ३० वर्षांपासून भारतात रहाणाऱ्या तिने मानव तस्करी आणि अवैध वास्तव्य रॅकेट चालवला.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : मुंबई – ३० वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतात रहाणाऱ्या बांगलादेशी किन्नर ‘गुरु मा’ उर्फ ज्योती शेख यांना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. ‘बाबू अयान शेख’ म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या आरोपीवर बनावट आधार, पॅन कार्डसह अनेक फसवणुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून लोकांना भारतात आणण्याचा रॅकेट चालवण्याचा गंभीर आरोप आहे.
पोलिस तपासात उघड झाले आहे की, ‘गुरु मा’ ने आतापर्यंत २०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतात आणले असून, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या रॅकेटची सुरुवात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद सीमेपासून झाली होती. नागरिकांना अवैधपणे भारतात आणल्यानंतर त्यांना कोलकाता येथे ४-५ दिवस थांबवून बनावट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि जन्म दाखले तयार केले जात होते. त्यानंतर मुंबईत आणून शिवाजी नगर परिसरात त्यांना आश्रय दिला जात असे.
मुंबईत ‘गुरु मा’ चे ३०० हून अधिक अनुयायी पसरलेले आहेत. पोलिसांच्या माहिती नुसार, ती प्रत्येक खोलीत ३-४ लोकांना ठेवून दरमहा ५,००० ते १०,००० रुपये वसूल करत असे. तसेच, ती म्हाडाचे फ्लॅट व झोपडपट्ट्या हडप करण्यासारख्या गुन्ह्यांमध्येही सक्रिय होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘गुरु मा’ ने २०० हून अधिक घरांवर कब्जा केला आणि भाड्याने देऊन दरमहा मोठा उत्पन्न मिळवत असे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही उघड झाले आहे की, आरोपीने काही लोकांना तृतीयपंथी बनवले आणि काहींना देह व्यापारामध्ये ढकलले, यासाठी ती त्यांना हायवे परिसरात पाठवत असे.
सध्या आरोपी ‘गुरु मा’ उर्फ बाबू अयान शेख हिच्या विरोधात बेकायदेशीर वास्तव्य, मानव तस्करी, फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस तपास यंत्रणा या नेटवर्कशी जोडलेल्या इतर सदस्यांचा आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेत आहे.
ही कारवाई पोलिसांसाठीही धक्कादायक ठरली आहे, कारण आरोपीने फक्त मुंबईच नव्हे, तर देशभरात बांगलादेशी नागरिकांचा अवैध व्यवसाय चालवला. मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मानव तस्करी होण्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेमुळे मानव तस्करी आणि फसवणुकीविरोधात पोलिसांच्या कडक कारवाईचा संदेश स्पष्ट झाला असून, भविष्यात अशा प्रकारच्या रॅकेट्सच्या विरोधात अधिक तीव्र कारवाई अपेक्षित आहे.