मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान – “मराठी भाषा कालही अभिजात होती, आजही आहे, उद्याही राहील”

0
मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान – "मराठी भाषा कालही अभिजात होती, आजही आहे, उद्याही राहील"

मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान – "मराठी भाषा कालही अभिजात होती, आजही आहे, उद्याही राहील"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या अभिजात परंपरेवर भर देत महत्त्वाचे विधान केले. मातृभाषा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे आवाहन.

सायली मेमाणे

पुणे ४ ऑक्टोबर २०२५ : मुंबई: भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने एक वेगळी सांस्कृतिक ठेव दिली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे आणि उद्याही अभिजातच राहील. मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. गावा-गावांतून, घरा-घरांतून ज्या ओव्या गायल्या जातात, त्या संतपरंपरेच्या आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या आहेत. माऊलीच्या ओव्यांपासून, रामप्रहरी येणाऱ्या वासुदेवांच्या गाण्यांपासून, देवळातून गुंजणाऱ्या आरतींपासून, भजन-कीर्तन आणि शाहिरांच्या पोवाड्यांपर्यंत हा सन्मान पोहोचतो.

त्यांनी पुढे सांगितले की, संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत मराठी भाषा ही नेहमीच विचारवंतांची वाहक राहिली आहे. या परंपरेतून मराठी भाषेने सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक आयाम समृद्ध केले आहेत. त्यामुळे मराठीचा सन्मान हा केवळ भाषेचा नव्हे तर आपल्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा सन्मान आहे.

फडणवीस यांनी उपस्थितांना आवाहन केले की, मराठी भाषेचा वापर वाढवणे, तिचे संवर्धन करणे आणि भावी पिढ्यांपर्यंत ती पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. भाषेचे अस्तित्व टिकवणे म्हणजे आपल्या इतिहासाचे आणि परंपरेचे अस्तित्व जपणे होय. जागतिकीकरणाच्या युगात विविध भाषांचे महत्त्व मान्य करताना मातृभाषेचा गौरव राखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी साहित्य, कला, संगीत, शास्त्र आणि लोकपरंपरा ही या भाषेची खरी ताकद आहे. ग्रामीण भागातील लोकसंस्कृतीपासून ते महानगरातील आधुनिक विचारांपर्यंत मराठी भाषा एक समान धागा जोडते. त्यामुळे मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून असंख्य पिढ्यांच्या भावविश्वाची शिदोरी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

त्यांच्या या विधानामुळे मराठी प्रेमी, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत मंडळींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मराठीच्या अभिजात परंपरेला सरकारकडून पाठबळ मिळाल्याने या भाषेच्या संवर्धनासाठी नवीन संधी उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed